प्रसिद्ध अभिनेत्री रत्ना पाठक - शहा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारामुळे प्रचंड प्रभावित झाल्या आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या गाजलेल्या एका भाषणाचा संदर्भ देऊन पाठक यांनी देशातील जनतेने हुकुमशाही पासून सावध राहण्याचे आवाहन केलं आहे.
रत्ना पाठक आपल्या अभिनयासाठी प्रसिद्ध आहेतच पण त्यांच्या राजकिय आणि सामाजिक जाणीवही सजग आहेत. राज्य घटनेला 75 वर्षे झाल्याच्या निमित्ताने त्यांनी 'सिव्हिलायझ इंडिया' वर आपला एक व्हिडिओ सादर केला आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्य घटना देशाला सादर करताना घटना समितीपुढे बोलताना या पुढील काळात देशापुढील आव्हानाचा आढावा घेतला होता. 26 जानेवारी 1950 पासून आपण स्वतंत्र श, सार्वभौम राष्ट्र म्हणून अस्तित्वात येत आहेत. तेव्हा पासून देशात लोकांनी लोकांसाठी लोकांमधून निवडलेले सरकारन असेल. आपल्याला राजकिय समानता मिळाली तरी आर्थिक, सामाजिक समता प्रस्थापित झाली नाहीतर काय होईल यावर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भाष्य केले होते. तसेच आल्यासारख्या सरंजामी देशात व्यक्ति पूजा करण्याची जनतेला सवय आहे. अशी व्यक्ति पूजा वाढली तर देशात हुकुमशाहीचा धोका आहे असा इशारा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला होता . डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या या भाषणातील हा महत्वाचा उतारा रत्ना पाठक यांनी वाचून दाखविला आहे. सध्याच्या काळात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार किती मूलगामी आहेत यावर रत्ना पाठक यांनी भर दिला आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या इशाऱ्याकडे देशवासियांचे लक्ष त्यांनी वेधले आहे.
रिपोर्टर